
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. २००७मध्ये दोघांनी लग्न केले आणि दोघांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. अभिषेक बच्चनने ऐश्वर्या राय बच्चनला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे, ज्यामुळे दोघांचे लग्न तुटणार आहे. पण खरंच तसं आहे का? अभिनेत्रीचं इन्स्टाग्राम अकाऊंट वेगळीच कहाणी सांगत आहे. कारण आजही ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते आणि ती म्हणजे तिचा नवरा अभिषेक बच्चन.