
आदित्य ठाकरे म्हणले, हे सरकार केवळ ६ महीने सत्तेत राहणार आहे. राज्यातील मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील. मात्र, असे असले तरी जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत त्यांना आम्ही पुन्हा सामावून घेणार नाही. भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष असून येत्या काळात आमच्या आमदारांची संख्या जास्तीत जास्त राहील असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.






