
१९९३ मध्ये मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात अबू सालेम दोषी होता. तो फरार होता. दरम्यान, २००५ मध्ये त्याला पोर्तुगाल सरकारने भारताच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर, त्याच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला होता. सालेम हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी आढळला होता. त्याला २०१७ मध्ये विशेष टाडा न्ययालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणी सध्या तो मुंबईच्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या कारागृहातून त्याला इतरत्र हलवण्यात येऊ नये अशी मागणी त्याने कोर्टात केली होती. मात्र, ही मागणी कोर्टाने फेटाळली होती. तसेच सालेम याने त्याला ११ नोव्हेंबर २००५ ला अटक करण्यात आली होती. तर त्याला ७ सप्टेंबर २०१७ ल शिक्षा सुनावण्यात आली होती. या दरम्यान, तब्बल १२ वर्ष सालेम हा तुरूगांत होता.