
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा रंगण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. परंतु, या सगळ्यादरम्यान बच्चन कुटुंब नेहमीच एकत्र दिसले आणि अशा चर्चांना त्यांनी केवळ अफवा असल्याचे दाखवून दिले. मीडिया रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की, ऐश्वर्याचे तिची सासू जया बच्चनसोबतचे संबंध चांगले नाहीत. परंतु, अशा अफवा असूनही बच्चन कुटुंब एकत्र दिसले आहे.








