
यश सर्वांसमोर बोलतो की, ‘ईशा इतकी रडकी आहे ना, सतत तिच्या नाकावर राग असतो आणि डोळ्यात पाणी असते. पण तुला भेटल्यापासून तिच्या नाकावरचा रागही तुझ्यासाठी आहे आणि डोळ्यातलं पाणी पण तुझ्यासाठी आहे. ईशा अत्यंत मूडी आहे. क्षणाक्षणाला तिचे निर्णय, मूड बदलत असतात. ती लहानपणापासूनच अशी आहे. पण एकच गोष्ट आजपर्यंत बदलली नाहीये आणि ती म्हणजे तिचं प्रेम. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी हे सहज सगळ्यांना सांगू शकतो. खरं तर तू आमच्या घरालं वादळ तुमच्या घरी घेऊन चालला आहेस. पण हे वादळ नुकसान करणार नाही.’








