
दुसरीकडे मायाने सांगितलेले सत्य ऐकून आशुतोषला रात्रभर झोप आलेली नाही. तो मनूला मायाकडे कसे सोडायचे असा विचार करत बसतो. आता खरच मनू आपल्यापासून लांब जाणार का? जर मनूला आता खरे नाही सांगितले तर भविष्यात ती आपल्याला दोष देत राहणार असे अनेक प्रश्न आशुतोषच्या मनात येत आहेत. तेवढ्यात सुलेखा ताई आशुतोषला सल्ला देतात की मनूला सत्य सांगायचे. त्यानंतर ती ठरवेल. आता मालिकेत पुढे काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.








