
दुसरीकडे अरुंधतीचा भाऊ भाऊबीजेसाठी घरी आलेला असतो. तेथे त्याची ओळख मनूशी होते. मनूचे बोलणे वागणे पाहून अरुंधतीच्या भावाला देखील ती आवडते. तसेच तिचे आणि आशुतोषचे नाते पाहून तो ही चकीत होतो. त्यानंतर अरुंधती आशुतोषला पाडवा असल्यामुळे ओवाळते. ती आशुतोषला ओवाळणी झाल्यावर गिफ्ट म्हणून मनूला देते. एकंदरीत मनूला दत्तक घेण्यासाठी अरुंधती तयार झाल्याचे दिसते. त्यानंतर ती देशमुखांच्या घरी जाते आणि मनूला दत्तक घेतलेल्या निर्णय सांगते. तिच्या या निर्णयावर आशुतोष आणि कांचन आजी आक्षेप घेतात. आता अरुंधती या सगळ्याला कशी समोरी जाणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.







