
गेल्या काही दिवसांपासून आशुतोषला मायावर संशय असतो. नितिन देखील भीती व्यक्त करत असतो. नितिन मायाची माहिती काढण्याचा प्रचंड प्रयत्न करतो. पण त्याला ती कुठेही सापडत नाही. मायाचे बोलणे ऐकून आशुतोष आणि नितिनचा संशय खरा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच आशुतोष मनूला मायाकडे सोपावणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.








