
दुसरीकडे आरोही आली नसल्यामुळे यशला असे वाटते की तिने साखरपुडा मोडला आहे. तो घडलेला प्रकार अरुंधतीला सांगतो. यशच्या मनात अनेक प्रश्न असतात. तेवढ्यात आरोही तेथे येते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. आरोहीला आलेली पाहून यशला आनंदाश्रू अनावर होतात. आता त्या दोघांचा साखरपुडा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







