
त्यावर आशुतोष अप्पांना समजावतो. ‘अप्पा, यशने असे काहीही केलेले नाही. यशला उपचाराची गरज आहे. यश ज्या वयातून जात आहे त्या वयातून आपण सर्वजण गेलो आहोत. परीक्षेत नापास झालो, कामात यश आले नाही तर काय करायचे याचा सल्ला आपण देतो. पण हेच जर नात्यांच्याबाबत घडले तर, म्हणजेच नाती तुटली, माणसे लांब गेली तर त्यातून कसे बाहेर यायचे, याचे शिक्षण कुठेच मिळत नाही’ असे यश म्हणतो.







