
आशुतोषला मानसिकदृष्ट्या खूप त्रास होतो. मनूला गमावणे त्याला सहनच होत नाही. अरुंधती गाडी चालवत असताना त्याला अचानक मनू रस्त्यावर दिसते. तो अरुंधतीकडे गाडी थांबवण्याचा हट्ट करतो. पण तेथे कोणीच नसल्यामुळे अरुंधती गाडी थांबवत नाही. आशुतोष चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतो आणि एका दगडावरुन जाऊन त्याचे डोके आपटते. अरुंधतीच्या गाडीचा देखील अपघात होतो. या अपघातामध्ये आशुतोषचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता मालिकेच्या आगामी भागात अरुंधतीची काय अवस्था असणार आहे याविषयी दाखवण्यात येणार आहे. तसेच मालिका आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.








