
आशुतोष आणि अरुंधती त्यांच्या प्रवासाला लागतात. अरुंधती गाडी चालवत असते. त्यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा सुरु असतात. दोघेही मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यासाठी ते लांबच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेताता. दरम्यान, अरुंधतीला भूक लागते. ते नास्ता करण्यासाठी एका धाब्यावर थांबतात. तेथे असलेल्या एका मुलीची मदत करण्यासाठी अरुंधती पुढे सरसावते. पण त्या मुलीला वाचवण्यासाठी काही गुंडे आणि आशुतोष यांच्यामध्ये मारामारी होते. आता या सगळ्यामुळे आशुतोष आणि अरुंधती पुढे हनीमूनला जाणार की परत येणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.









