
गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते मालिकेत अनेक वळणे पाहायला मिळाली. एकीकडे अरुंधतीने तिचा नवा संसार मांडला आणि तिचा संसार मोडण्यासाठी अनिरुद्धने अनेक प्रयत्न केले. तर दुसरीकडे ईशा अनिशशी लग्न करण्याचा हट्ट करत बसली. ईशाच्या निर्णयाला देखील अनिरुद्धचा नकार होता. आता मालिकेत आणखी एक नवे आले आहे. अनघा पुन्हा कामावर रुजू झाली आहे. मात्र, कांचनचा या सगळ्याला विरोध आहे.








