
मराठी माणसांसाठी राजकारण करणाऱ्या मनसे व ठाकरे गटाला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, ही अनेक मराठी जणांसोबतच शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण जो माझ्या आजारावर टिप्पणी करतो त्याच्यासोबत आम्ही कधीच एकत्र येणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी विधानसभेवेळी स्पष्ट केले होते. दोन्ही भावांनी याआधीही एकमेकांस टाळी देण्यास नकार दिला होता. गेल्या जवळपास २० वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेले हे दोन ठाकरे बंधू वेगवेगळ्या वाटेने चालत आहे. मात्र आज एका समारंभानिमित्त राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने तसेच दोघांमध्ये संवाही झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.




