
Mumbai Gateway Of India Boat Accident : मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात नौदलाची स्पीड बोट अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि पर्यटकांनी भरलेल्या बोटीला धडकली. बुधवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत तीन खलाशांसह तेरा जणांचा मृत्यू झाला. बचावकार्यात आणखी १०१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात अपघाताचा थरार कैद झाला आहे. या घटनेत बचवलेल्या गणेश नामक ४५ व्यक्तिने या घटनेचा थरार कथन केला. मृत्यू वेगाने आमच्या दिशेने येत होता आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं, असे गणेश म्हणाले.







