
सोमवारी ९ डिसेंबर रोजी कुर्ली पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर या ठिकाणी भरधाव बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या बसने रस्त्यावर चालणाऱ्या तब्बल १० ते १२ जणांना चिरडले होते. या घटनेत सात जण ठार झाले होते. मृतांमध्ये विजय विष्णू गायकवाड (वय ७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा (वय १९), अनम शेख (वय २०), कणीज फातिमा गुलाम कादरी (वय ५५), शिवम कश्यप (वय १८), मोहम्मद फारुख चौधरी (वय ५४), मोहम्मद इस्लाम (वय ४९) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर आज या अपघातात जखमी झालेल्या आठव्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल ६० प्रवासी प्रवास करत होते.






