
Manoj Jarange News: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेवर मराठा सामजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली. तसेच आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर जड जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.







