Viral News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनी हा निकाल मान्य नसल्याचे म्हटले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनीही संशय व्यक्त करत सोशल मीडियातून प्रश्न उपस्थित केले आहेत.