[ad_1]
वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या निर्णयावर आरएसएसपाठोपाठ विश्व हिंदू परिषद व आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेने देखील टीका करत महाराष्ट्रातील महायुती सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक, महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम वक्फ बोर्डाला २०२४-२५ या आर्थिक वर्षात डिजिटायझेशनसाठी देणार आहे. मात्र, यावर नाराजी व्यक्त करत विश्व हिंदू परिषदेने शुक्रवारी सांगितले की, जे काम काँग्रेस सरकारने केले नाही ते काम महायुती सरकार करत आहे. हा केवळ मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेने केली होती.
[ad_2]
Source link
