
युनियनचे नेते शशांक राव काय म्हणाले?
युनियनचे नेते शशांक शरद राव यांच्या मते, राज्यात किमान १५ टक्के रिक्षा, तर एमएमआरमध्ये ८ ते १० टक्के रिक्षामालकांनी वाहनफिटनेसचे नूतनीकरण केलेले नाही. मुंबईत ज्या रिक्षामालकांनी फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नाही, अशा रिक्षांची संख्या खूपच कमी आहे. मात्र, ठाणे, नवी मुंबईतील भागात त्यांची संख्या मोठी आहे,’ अशी माहिती संघटनेचे नेते शशांक शरद राव यांनी दिली.