
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेतील सागर आणि मुक्ताने प्रेक्षकांच्या मनात घर करत टीआरपी यादीमध्ये देखील स्थान पटकावले आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आदित्यने माधवीचा अपघात केला आणि या सगळ्याचा सावनी फायदा घेताना दिसत आहे. पण आता शेवटी सागरने सर्वांना सत्य सांगितले आहे.







