
पोहता येत नसतानाही पाण्यात उडी
मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन संतोष नवले (वय, १३) आणि आयुष संतोष नवले (वय, १०) असे अशी शेततळ्यात पडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. आर्यन आणि आयुष हे दौंड तालुक्यातील राहु येथील रहिवाशी असून सुट्टीनिमित्त पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे आले. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सुमारास दोघेही बापू जाधव यांच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्याजवळ गेले. यानंतर पोहता येत नसून दोघांनी पाण्यात उडी मारली आणि बुडाले.





