
आजी देणार दोघांना शपथ!
यावेळी तो लीलाला आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी चल, असं म्हणतो. मात्र, लीला त्याच्याबरोबर घरी जाण्यास थेट नकार देते. ‘माझ्यासाठी नाही किमान आजीसाठी घरी चल, आई काहीच खात नाहीये आणि सारखं तुझंच नाव घेतेय. तिला बरं वाटावं म्हणून तरी घरी चल. एवढी एकच मागणी मी तुझ्याकडे करतोय’, असं म्हणून अभिराम तिला घरी चलण्यास सांगतो. मात्र, त्याच्याबरोबर गाडीतून घरी जाण्याऐवजी लीला रिक्षात बसून अभिरामच्या घरी पोहोचते. लीलाला बघून आजी खूप खुश होते. इतकंच नाही तर, सकाळपासून उपाशी असलेल्या आजीला लाली ज्यूस आणि नाश्ता देखील खाऊ घालते. यावेळी सगळ्यांना बाहेर पाठवून लीला आणि अभिरामला बोलवून आजी दोघांनाही एकमेकांशी लग्न करा, तुम्हाला माझी शपथ आहे, असं म्हणते. आता आजीने शपथ घातल्यामुळे लीला आणि अभिराम चांगलेच पेचात अडकले आहेत.







