[ad_1]
सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांना आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत असल्याची आठवण तर करून दिली आहे. मात्र, दोघांमधील दुरावा आता त्यांना सहन होत नाहीये. सायली आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तरी, त्यांनी अद्याप दोघांनी एकमेकांना याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे दोघांच्या मनातील भावना अजूनही अव्यक्तच राहिल्या आहेत. याला कारण त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधला एक क्लॉज देखील आहे. परंतु, आता लग्नाचा करार संपत आल्यावर सायली तिच्या मनातील भावना कुसुम ताईसमोर व्यक्त करणार आहे. सायलीला असं वाटत आहे की, ती एकतर्फी प्रेमात पडली आहे आणि अर्जुनच्या मनात तिच्याबद्दल काहीही नाही.
[ad_2]
Source link
