
विरोधातील राजकीय पक्षांसह मराठा संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सत्ताधारी भाजप व त्यांच्या मित्र पक्षावर टीकेची झोड उठवली. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष रोजच्या रोज महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तर, प्रफुल्ल पटेल यांना यातून कोणता संदेश द्यायचा आहे, असा सवाल संभाजी ब्रिगेडनं केला.





