
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. राज्यातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, औरंगाबाद, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघांचा यात समावेश आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. राज्यातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, औरंगाबाद, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघांचा यात समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याने सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे.
चौथा टप्पा भाजपाप्रणित एनडीए आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरणार आहे. या टप्प्यात थोडे ग्लॅमरही जोडलेले आहे, जेथे ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून निवडणूक लढवत आहेत. दक्षिणेत अभिनेत्री माधवी लता तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत एमआयएम पक्षाचे चार वेळा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याशी आहे. यासोबतच मतदार 5 केंद्रीय मंत्री आणि एका माजी मुख्यमंत्र्यांच्या भवितव्यावर ईव्हीएमवर शिक्कामोर्तब करतील.









