
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.13) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 11 मतदारसंघांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.13) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहे.
दरम्यान, याआधी पहिल्या तीन टप्प्यांत झालेल्या मतदानास मतदारांचा कमी प्रमाणात प्रतिसाद दिसून आला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह 4 विरोधकही चिंतेत आहेत. यामुळे निदान चौथ्या टप्प्यात तरी जास्त प्रमाणात मतदान होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.