
[ad_1]
जरागे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्याकडे आरक्षणासंदर्भात विनंती केली होती. त्यांच्या कानावर घातलं होतं की, तुमचा माणूस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून खोट्या केसेस अंगावर टाकतोय, हे थांबवा. मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. अशी मागणी आतापर्यंत दोनदा केली आहे. मी सुद्धा क्षत्रीय मराठा आहे,आता पुन्हा विनंती करणार नाही. मराठ्यांना६जूनपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आणि महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवणार, असा इशारा जरांगे पाटलांनी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे.
[ad_2]
Source link
