
मतदानाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जेव्हा ४००चा पार आकड्याचा उल्लेख व्हायचा, तेव्हा जनता समाधानी आहे, त्यांना केंद्रात पुन्हा मोदी सरकार हवे आहे, असा त्याचा अर्थ घेतला जायचा. परंतु, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपने या घोषणेचा अर्थच बदलला आहे.
PM Modi Changed Slogen Meaning : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता भाजपने ‘अब की बार 400 पार’ दिलेल्या नाऱाचा अर्थ बदलून वेगळा अर्थ सागंत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रसंगी ४०० पारचा नारा दिला आहे. यंदा सरकारच्या कामगिरीच्या जोरावर ते जनतेकडून ४०० जागा मागत आहेत. विशेष म्हणजे मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासून हा नारा प्रत्येक रॅलीत आणि प्रत्येक प्रचारात ऐकू येत होता. मात्र, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर हे सर्व बदलले, एकीकडे ४०० पारचा नारा गायब होताना दिसत होता, तर दुसरीकडे कुठेतरी त्याचा वापर केला जात असला तरी तो वेगळ्या उद्देशाने जनतेसमोरे ठेवण्याचा प्रयत्न भाजपाने चालवला आहे.
आरक्षण वाचवण्यासाठी अब की बार…….











