
मुरुड येथे मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाहोल केला. जयंत पाटील म्हणाले की, सुनील तटकरेंना त्यांचे भाऊ अनिल तटकरे यांनी पुढं आणलं. मात्र सुनील तटकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता आपल्याला सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीत उभं राहणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करायची आहे. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे.







