
२००४ मध्ये काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलेला गोविंदा जायंट किलर ठरला होता. पाच वेळा लोकसभेचे मैदान मारणारे राम नाईक यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत होती. त्यांच्या विजय निश्चित मानला जात होता. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या गोविंदाने येथे धक्कादायकरित्या विजय मिळवला होता. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते. येथून राम नाईक यांनी १९८९, १९९१, १९९६, १९९८ व १९९९ च्या लोकसभेत सलग पाच विजय मिळवले होते. या या मतदारसंघात विरारचा समावेश होता. मात्र २००९ मध्ये मतदारसंघ पुर्नरचना झाल्यानंतर विरार पालघरला जोडण्यात आले.







