
भाजपला जड जाणार?
वरुण गांधी हे मागील १५ वर्षांपासून पिलीभीतचं नेतृत्व करत आहेत. त्याआधी त्यांच्या मातोश्री मनेका गांधी इथून खासदार होत्या. त्यामुळं त्यांच्या कुटुंबाचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. याशिवाय, वरुण गांधी हे आक्रमक हिंदुत्वाचीही भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळं भाजपचा मतदार त्यांच्याशी जोडला गेला आहे. तरुणांमध्येही त्यांच्याबद्दल आकर्षण आहे. भाजपनं त्यांचं तिकीट नाकारून चूक केल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे. वरुण हे अपक्ष लढल्यास त्यांच्या प्रतिमेचा भाजपला मोठा फटका बसू शकतो, असंही बोललं जात आहे.








