
का घेतला लेखक होण्याचा निर्णय?
एका जुन्या मुलाखतीत गुलजार यांनी म्हटले होते की, एकदा त्यांना कोणीतरी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले पुस्तक दिले होते. ‘द गार्डनर’ असे त्या पुस्तकाचे नाव होते. त्यांनी हे पुस्तक वाचले आणि त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी लेखक व्हायचं ठरवलं. गुलजार यांनी लेखक व्हायचं ठरवलं होतं. पण, हे स्वप्न पूर्ण करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. सुरुवातीला त्यांचे वडील त्यांच्या निर्णयाच्या विरोधात होते. मात्र, त्यांनी ठाम निश्चय केला होता. या दरम्यान त्यांनी अनेक लहानमोठ्या नोकऱ्या केल्या. मात्र, आपली जिद्द सोडली नाही.







