Sadhi Mansa: एकाच गोष्ट गुंफली जाणार दोन टोकाची पात्र; ‘साधी माणसं’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
22
Sadhi Mansa: एकाच गोष्ट गुंफली जाणार दोन टोकाची पात्र; ‘साधी माणसं’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला


या जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात ‘साधी माणसंट या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या पा या गोष्टीतली दोन मुख्य पात्र आहेत. एकाच गावात रहात असलेल्या या दोन व्यक्तींचे स्वभाव मात्र टोकाचे आहेत. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी मुलगी आहे. तर, घरची परिस्थिती बेताची असली, तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास तिने नेहमीच बाळगला आहे. मात्र, सत्या आणि नशिबाचा ३६चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं, पण आता तो गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करत आहे. स्वत:च्या धुंदीत रहाणारा सत्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. अशा या दोन विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यासोबत नियती आता कोणता खेळ खेळणार, याचीच गोष्ट ‘साधी माणसं’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.



Source link