
शेवटच्या मराठ्याला आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नसल्याचे जरांगे म्हणाले. नोंदी सापडलेल्यांसोबतच त्यांच्या सगे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची सरकारने अंमलबजावणी करावी. नोंद मिळालेल्या सगेसोयऱ्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर खरा गुलाल उधळु, विजय साजरा करु असे जरांगे पाटील म्हणाले.







