
‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर आता यशच्या आयुष्यात पुन्हा गौरी आली आहे. तिच्या येण्याने आरोही आणि यशच्या आयुष्यात वादळ आले आहे. तरीही यशने त्याचा निर्णय बदललेला नाही. त्याने आरोहीशी साखरपुडा केला आहे.








