
लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या INDIA आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व १३ जागांवर उमेदवार देण्याचा दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला केवळ २ जागा सोडण्यास तयार आहे. १९ डिसेंबर रोजी INDIA आघाडीची चौथी बैठक होणार आहे. यामध्ये ममता जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत. टीएमसी सूत्राकडून समजते की, ममता काँग्रेसला प्रस्ताव देऊ शकतात की, केवळ मालदा आणि बरहामपूर मतदारसंघ काँग्रेससाठी सोडू शकतात.








