
Maharashtra weather update : राज्यावर सध्या विशेष कुठलीही सिस्टीम नसल्यामुळे राज्यात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील व आकाश निरभ्र राहणार आहे. पुढील ७२ तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. राज्यावरून वाहणाऱ्या दक्षिण दक्षिण आग्नेय वाऱ्यामुळे हवेतील आद्रता वाढली आहे. तसेच उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नसल्यामुळे किमान तापमानात पुढील पाच ते सहा दिवस पुढे जास्त काही बदल होणार नाही. दरम्यान, तापमानात हलकी वाढ होणार असली तरी काही भागातील थंडी कायम राहणार आहे.








