
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी आमदार सत्यजीत तांबे यांनी दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोह फुलांपासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन संदर्भात सभागृहात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले. मोह फुलापासून दारू निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन कसे काय झाले? या कंपनीला सर्व परवानग्या कशा काय मिळाल्या? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशीही मागणी आ. तांबेनी सभागृहात केली.





