
पान मसाल्याचे प्रमोशन करणारे अभिनेते शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण या तिघांनाही सिनेसृष्टीमधील कामगिरीसाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे हे पाऊल तरुणांसाठी योग्य नाही, असे मत याचिका दाखल करणारे वकील मोतीलाल यादव यांनी व्यक्त केले. या कलाकारांमुळे लोकांचा भ्रमनिरास होत आहे. ऑगस्ट २०२३मध्ये, हायकोर्टाने या याचिकेला प्रतिसाद न दिल्यामुळे कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना अवमान नोटीस जारी करण्यात आली आहे.






