
का पाहावा चित्रपट?
‘द आर्चिज’ या चित्रपटातून १९६४चा काळ बघायला मिळत आहे. काल्पनिक असला तरी अँग्लो इंडियन लोक या काळात लोक कसे दिसत असतील आणि कसे राहत असतील, याची कल्पना करता येते. या चित्रपटातील सगळी पात्र एकमेकांशी जोडलेली आहेत. प्रत्येक पात्र कथेत एकमेकांची काळजी घेताना दिसते. हे काल्पनिक हिल स्टेशनची प्रतिमा शेवटपर्यंत मनात तशीच चमकत राहते. सगळं काही रंगीबेरंगी आणि स्वप्नवत वाटू लागतं. तर, जेव्हा हे सगळे मिळून लढा देतात तेव्हा त्यांच्या वेदना प्रत्येकाच्या मनाला बोचतात. सगळ्याच कलाकारांच्या भूमिका खूप चांगल्या झाल्या आहेत. अगस्त्य नंदा, ख़ुशी कपूर आणि सुहाना खान तिघांनीही आपापल्या पात्रांना योग्य न्याय दिला आहे. त्यांचा हा चित्रपट एकदा तरी पाहायलाच हवा.







