
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने सक्त मार्गदर्शक तत्वे तयार करून सर्व घटकांपर्यंत ती पोहोचवली तसेच त्याची योग्य अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आले आहे. याच धर्तीवर आता संपूर्ण स्वच्छता मोहिमेची मार्गदर्शक तत्वे तयार करून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिलेत.



