
सावनी सईला घेऊन गेली आहे. सागर हा योग्य बाप नसल्यामुळे सावनी सईला स्वत:च्या घरी घेऊन जाते. तिला सर्व हव्या-नको त्या गोष्टी पाहाते. मात्र, या सगळ्यातून सई आनंदी नसते. तिला पुन्हा घरी जाण्याची इच्छा होते. सागर वकिलांना सांगून तिची कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आता तो या सगळ्यात जिंकणार की सावनीला सईची कस्टडी मिळणार ? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सावनी सईला घेऊन गेल्यामुळे मुक्ताची चिंता वाढते. ती ठिक असेल ना? तिला करमत असेल ना? असे अनेक प्रश्न मुक्ताला पडले आहे.








