
आमिर खान काही काळासाठी मुंबई शहर सोडून चेन्नईला शिफ्ट होत असल्याचे समोर आले आहे. आमिर खान याने असा अचानक मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला आहे?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र, आमिर खान कायमचा नव्हे, तर काही काळासाठीच चेन्नईला जाणार आहे. यामागे त्याचे वैयक्तिक कारण आहे. आमिर खानची आई सध्या चेन्नईत असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत आमिरलाही तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे.







