
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दूरदर्शन नॅशनल चॅनेलला आलियाने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आनंद व्यक्त करत संजय लीला भन्साळींचे आभार मानले. “मला जे वाटतंय ते मी शब्दात मांडू शकत नाही. मला खूप आनंद होत आहे. खूप वेगळी भूमिका मला साकारण्याची संधी मिळाली. मी आता संजय लिला भन्साळी यांना खूप मिस करत आहे. त्यांनी हा चित्रपट दिला, त्यासाठी मी त्यांचे जेवढे आभार मानेल तेवढे कमी आहेत. हा माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे” असे आलिया म्हणाली.








