
महाराष्ट्रात भाजपचे प्रमुख नेते असलेल्यांनी थेट माझ्यावर टीका करताना मला घरी जाऊन चुल सांभाळण्याचा सल्ला दिला होता. सुप्रिया सुळेंनी घरी जावं, जेवण बनवावं, देश कुणी दुसरे चालवतील, आम्ही चालवू, असे म्हटले होते. हे टेलिव्हीजनवर ऑन रेकॉर्ड आहे, असेही त्यांनी म्हटले. असे म्हणत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे.




