
प्रियाचा खोटेपणा समोर आणून तुम्ही मधुभाऊंना नक्कीच बाहेर काढाल, असा विश्वास सायलीने व्यक्त केला आहे. तर, आता सायलीचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अर्जुन देखील मेहनत घेणार आहे. अर्जुनने पूर्णपणे या केसची धुरा स्वतःच्या हातात घेतली आहे. आता मधुभाऊ यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः अर्जुन अनेक प्रयत्न करणार आहे. अर्जुन आता विलासच्या खुनाची नाट्यमय पुनरावृत्ती करणार आहे.







