
अनुराग कश्यपचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. त्याचा सुरुवातीचा प्रवास अतिशय संघर्षमय होता. मनोज वाजपेयी यांनी राम गोपाल वर्मा यांना लेखक म्हणून अनुराग कश्यप यांचे नाव सुचवले होते. अशाप्रकारे अनुराग कश्यपला सौरभ शुक्लासोबत ‘सत्या’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. २००३मध्ये अनुरागने ‘पांच’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. मात्र, त्याचा हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही. अनुराग कश्यप ‘रमन राघव २.०’, ‘मनमर्जियां’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचे काही चित्रपट हे प्रत्येकाच्या वॉच लिस्टमध्ये असायलाच हवेत.







