
तेवढ्यात अभी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की तो जे करत आहे ते योग्यच आहे. दरम्यान, अनिरुद्धने तूला आता तुझी किंमत कमी होत आहे हे पाहून वाईट वाटत असले. तू नेहमी तुझाच विचार केला आहे. ते ऐकून संजनाला राग येतो. ती रागाच्या भरात म्हणते, ‘शेखर कसाही असला तरी तो माझा आदर करायचा. माझ्या प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा द्यायचा. सतत माझा विचार करायचा. माझे त्याच्यावर अजूनही प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करणे माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती आणि ती आज मी सगळ्यांसमोर मान्य करते.’








