
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. त्यांनी मुंबईतील गुणीदास संमेलन, पुण्यात झालेले सवाई गंधर्व महोत्सव, ग्वाल्हेरमधील तानसेन समारोह आणि दिल्लीत झालेल्या शंकर लाल महोत्सवामध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली होती. मालिनी टप्पा आणि तराना या गायकीसाठी विशेष ओळखल्या जात होत्या. त्यांची काही नाट्यगीते गाजली होती. त्यामध्ये ‘नरवर कृष्णासमान’ आणि ‘पांडू-नृपती जनक जया’चा समावेश आहे.








